पोस्ट्स

पृथ्वी

ठाऊक असे या असीम अंतरिक्षा, तुझी जी मी करीतसे ही प्रतिक्षा, न कोणी दिली न देईल अशी परिक्षा, युगेयुगे तुजसवे भ्रमणाची घेत दिक्षा!

मार्गदर्शन करावे

मुखवटा घालून जगायला जमत नाही. अहंकारी ही उपाधी सुटत नाही. एकटेपण साथ सोडत नाही. मनाजोगी संगत मीळत नाही. मुल्यांच्या बाबतीत तडजोड करवत नाही. सद्सद्विवेकबुद्धी गुंडाळून कोणाचे समर्थन करवत नाही. अभिनय जमत नाही, भूमिका वठवत नाही. अशांनी कुठे जावे याविषयी मार्गदर्शन करावे.

अपेक्षांची पूर्ती

इतरांकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर राग येतो. पण आपल्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती झाली (का) नाही याचा विचार करु लागलो की अवास्तव तणाव निर्माण होतो. स्वतःला दोषी समजणे हा त्याचाच एक भाग. स्वतःच्या मर्यादा आणि अपूर्णत्व आनंदाने स्वीकारता आले पाहीजे.
कोणतेच पेरलेले धान्य १००% उगवत नाही. साधारण ७०-९०% म्हणजे चांगली उगवण. न उगवलेले बीज खत होऊन उगवणाऱ्या बीयांच्या वाढीला सहाय्य करते. आणि #धान्य उगवत नाही म्हणून कोणी तण पेरत नाही. सगळ्याच सत्कर्मांचा परतावा मीळत नाही. पण म्हणून दुष्कर्म करु नये. उगवेल ते आपले समजावे.

एक गाव

आपल्या आत आपले   एक  गाव असते. तिथे आपले घर असते. एखादे मंदिर असते. बाग असते. मित्र आणि शत्रुंचीही घरे असतात. भावकी-गावकी असतेच. शिवाय काही गटर आणि उकिरडे पण असतात. आपण मंदिरात किंवा स्वतःच्या घरात थांबायचे ठरवु शकतो. पण बरेचदा आपण गाढवासारखे उकिरड्यावर किंवा डुकरासारखे गटरात असतो.

असे का?

ऐकुनही माझे तू न ऐकले काही, स्विकारले म्हणता, टाळलेही काही! अचानक तू निघतां, मन बावरले काही, समजावता मी मला, समजलेही काही. अश्रुच तर होते, मीही रोखले काही, ज्यांनी ना मानले, ते ओघळलेही काही.

का ?

माझ्या वेदनेचा होता जरासा उल्लेख, नाराज तू व्हावे अशी काय आहे मेख? समजावती लोक मला, असु नये इतके भोळे, पण तुला काय झाले, का झुकले तुझे डोळे? फसविले कोणी,  अन् फसली ही बिचारी! कोणी बोले मला, का तुझी उडते रया सारी? जखमा माझ्या पाहताना, तो वैद्यही थोड़ा रडला, वेड्या होईन रे मी ठीक, पण चेहरा तुझा का पडला?